तीर्थक्षेत्र
narasimha-mandir-bhatodi
|| तीर्थक्षेत्र ||
नृसिंह मंदिराची स्थापना 1300 ते 1400 च्या दरम्यान करण्यात आली होती. या मंदिराचे स्थापक कान्हो नर्सों हे शाही दरबारातील प्रधान होते. त्यांनी भक्कम तटबंदी करून मंदिराचे दगडी बांधकाम पूर्ण केले. मंदिराच्या समोर बहाल मेहकरी नदी बहात आहे, ज्याचा उगम जवळील गर्भगिरी डोंगररांगेतील परिसरातून झाला आहे.
या मंदिराचे प्रतीरूप पाकिस्तानातील कराचीच्या नरसिंमपाल भागात असल्याचे मानले जाते. दरवर्षी नृसिंह जयंतीच्या निमित्ताने येथे मोठा उत्सव साजरा केला जातो, ज्यावेळी राज्यभरातून आणि देशभरातून भाविक मंदिरास भेट देतात.
भातोडी गावाला एक महत्वपूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. 1624 मध्ये भातवडी येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईसाठी हे गाव ओळखले जाते. या लढाईत महाजीराजेंनी गनिमी काव्याने विजय मिळवला, परंतु शहाजीराजेंचे धाकले भाऊ आणि छत्रपती शिवरायांचे चुलते शरीफजीराजे भोसले या लढाईत शहीद झाले. शरीफजीराजे भोसले यांचे समाधीस्थळ भातोडी गावात आहे.
अहमदनगर शहरापासून भातोडी गाव नगर-बीड रोडवर 18 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.